‘काही बेरोजगार तरुण म्हणजे झुरळे’; या वक्तव्यावर वादानंतर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं स्पष्टीकरण, जाणून घ्या काय म्हणाले
भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी शुक्रवारी (15 मे) एका सुनावणी दरम्यान केलेल्या वक्तव्याप्रकरणी आज (16 मे) स्पष्टीकरण दिलं आहे. लाइव्ह लॉ आणि बार अँड बेंचच्या वृत्तानुसार, प्रसारमाध्यमांतील एका गटाने आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला आणि मी देशातील युवकांवर टीका केली असल्यासारखे चित्र उभा केलं, असं सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे. सोशल मीडियावर वाद निर्माण झाल्यानंतर सरन्यायाधीशांनी जारी केलेल्या...



